Friday 11 September 2009

१२ सप्टेम्बर १६६६

१२ सप्टेम्बर १६६६ - आग्र्याहून स्वतःची सुटका करून शिवाजी राजे राजगडी सुखरूप परतले.

१७ ऑगस्ट १६६६ रोजी शिवाजी राजे व बाळ शंभूराजे पेटार्‍यासह आग्र्याहून निसटले होते. तर २० ऑगस्ट १६६६ रोजी शिवाजीराजांनी दख्खनेमध्ये येण्यासाठी 'नरवीर घाटी' हे मुघली ठाणे खोटे दस्तक दाखवून ओलांडले होते. आग्र्याहून पसार झाल्यावर शंभूराजांना मथुरेमध्ये ठेवून अवघ्या ३ दिवसात राजांनी हे ठाणे ओलांडले.

No comments:

Post a Comment